सध्याचे युग हे
तंत्रज्ञांनाचे युग आहे. आता जवळ जवळ सर्वच दस्तावेज कॉम्पुटरमध्ये पाठवले जातात.व
गरज असेल तेव्हा इंटरनेट वरून एकीकडून दुसरीकडे पाठवले जातत. सध्या तर डीजीटल
इंडिया संकल्पनेतून सुरु झालेले कँशलेश व्यवहार आणि सोहल मिडिया यांचावापर अधिक प्रमाणात वाढला आहे.
परंतु या नवनवीन तंत्रज्ञानाच्या शोधाचा एक दुष्परिणाम म्हणून सायबर गुन्ह्यात वाढ
होत आहे. मोबाईल आणि संगणकाच्या माध्यमातून होत असणारा गुन्हा,यालाच सायबर गुन्हा
म्हणतात.संगणकावरील माहितीची चोरी करणे,संगणक नेटवर्क, सर्वरमध्ये बिघाड
करणे,इंटरनेटचा उपयोग करून छळने, इमेलच्या सहाय्याने फसवणूक करणे, क्रेडीट कार्ड
द्वारे फसवणूक करणे, बनावट नोटा, पायरसी, अशील चित्रे, मेसेज इत्यादी प्रकारे
सायबर गुन्हे केले जातील.आधुनिक काळात ही एक जागतिक समस्या बनली आहे.
भारतात सायबर यंत्रणेवर अवलंबून
असणार्यांचे प्रमाण अधिक आहे.या मोबाईल धारक आणि इंटरनेट ग्राहक यांचा समावेश
होतो. आय.टी उद्योग, दूरसंचार क्षेत्र,आर्थिक सेवा, बँकिंग क्षेत्र, विमान
क्षेत्र,वाहतूक सेवा, आरोग्य सेवा, उर्जा क्षेत्र यात खाजगी क्षेत्रांची माहिती
लक्षणीय प्रमाणात आहे.परंतु पुरेश्या सुरक्षेसाठी ही क्षेत्रे सायबर हल्ल्यांना
सहजपणे बळी पडू शकतात हे पाहता सायबर सुरक्षेची नितांत गरज आहे.जागतिक पातळीवरील
वाढत्या सायबर हेरगिरीच्या पार्श्वभूमीवर दूरसंचार मंत्रालयाने ‘राष्ट्रीय सायबर
सुरक्षा 2013’ धोरण तयार करण्यात आले.परंतु भारतात सायबर सुरक्षा व्यवस्था म्हणावी
तेवढी चोख नाही.त्यामुळे भारत हा सायबर हल्लेखोरांचे लक्ष्य होणे उघड आहे. देशाची संरक्षण व्यवस्था, आर्थिक, वैज्ञानिक व अंतराळ
संशोधनाशी संबंधित संस्थाना यादृष्टीने अत्यंत सुरक्षित करावे लागेल. अन्यथा आपले
शत्रू अपरिमित नुकसान करू शकतील.
हे टाळण्यासाठी सायबर सेक्युरिटी व्यवस्था नेहमी अद्द्यावत ठेवावी व उत्तमात उत्तम असे दर्जेदार
अँन्टी व्हायरस सॉफ्टवेअर वापरावे. अनोळखी आणि संशयास्पद मेल उघडू नका. पॉर्न
साईटपासून कटाक्षाने दूर राहावे. व्यक्तिगत पातळीवर सुरक्षेची काळजी घेतली तर
सायबर हल्ल्यापासून बर्याच प्रमाणात वाचता येऊ शकेल. खास करून अधिकारी आणि सरकारी
खात्यांनी अधिक सावध राहावे.
No comments:
Post a Comment