Wednesday, 2 May 2018

स्मार्ट शहरे कि प्रदूषित शहरे

                    देशातील जास्तीत जास्त शहरे स्मार्ट बनविण्याचा  संकल्प करण्यात आला. स्मार्ट शहरे म्हणजे स्वच्छ व सुंदर शहरे. जिथे पायाभूत सुविधा असतील, जिथे शाश्वत विकासाला प्राधान्य असेल, जिथे पायाभूत सुविधांची कमतरता नसेल. प्रत्येक कामासाठी स्मार्ट सुविधा असतील .स्मार्ट सिटीमध्ये प्रामुख्याने पायाभूत सुविधा, ई-प्रशासन, पुरेसा पाणी पुरवठा, सुनिश्चीत वीजपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, सक्षम सार्वजनिक परिवहन अश अनेक प्रकल्पांचा समावेश आहे. परंतु नुकताच  जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केलेल्या  प्रदूषण संदर्भातील अह्वालामुळे शहरे  स्मार्ट होत आहेत कि प्रदूषित याची शंका निर्माण होत आहे.
                  
                 जागतिक आरोग्य संघटनेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या जगातील सर्वाधिक वीस प्रदूषित शहरांच्या  यादीत सर्वाधिक भारतीय शरंचा समावेश आहे. या यादीतील वीस पैकी चौदा प्रदूषित शहरे 
हि केवळ भारतातच आहेत. दिल्ली, मुंबई, कानपूर फरीदाबाद, गया,पाटणा, आग्रा, मुझ्झफुरनगर, जयपूर, जोधपुर यासारख्या शहरात प्रदूषणाची पटली सर्वाधिक आहे असे या अहवालात म्हटले आहे. या अहवालानुसार मुंबई शहराचा जागतिक स्तरावर चौथा क्रमांक आहे. वाढते उद्योगधंदे, वाढते शहरीकरण, वाढते लोकसंख्या यामुळे  व अशा अनेक कारणांमुळे पर्यावरनाची हानी होत आहे .स्मार्ट सिटी साठी निवडलेल्या शहरांचाच या प्रदूषित शहरांच्या आहवालात जास्त प्रमाणात समावेश आहे. त्यामुळे या प्रश्कडे लक्ष देणे गरजेचे आहे.           
              पर्यावरण  संरक्षण हि एक सामाजिक जबाबदारी असून त्यासाठी पर्यावरण सरंक्षण करणे हि सर्वांची सामाजिक बांधिलकी आहे. पृथ्वीवरील सर्व सजीव सृष्टींचा आधार पर्यावरण  आहे. पृथ्वी सोडून इतर कोणत्याही ग्रहावर यासारखे पर्यावरण नाही. त्यामुळे येथील  पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करणे सर्व सजीव सृष्टीस अत्यावश्यक आहे. कोट्यवधी वर्षाच्या स्थित्यंतरानंतर येथील हवा, पाणी व जमीन यांचे पोषक असे वातावरण तयार झाले असले तरी गेल्या काही दशकात मानवी उद्योगामुळे त्यात बरेच बदल होत आहेत. त्यामुळे शहरे स्मार्ट करण्याच्या अगोदर प्रदूषण विरहीत शहरे निर्माण करणे गरजेचे आहे.


















No comments:

Post a Comment