आधुनिक कंपनी व्यवसायात केवळ लाभप्राप्ती हे व्यवसायाचे उद्दिष्ट मानले जात
नाही. त्यापेक्षा अधिक व्यापक व उद्दात उद्धिष्ट पूर्ण करण्यासाठी व्यवसायाने
कार्य केले पाहिजे अशी समाजची अपेक्षा असते. त्यातूनच सामाजिक दायित्वाची कल्पना
अस्तित्वात आली आहे. व्यवसाय समाजाचा घटक आहे. त्याने समाजच्या उन्नतीसाठी योगदान
दिले पाहिजे हा विचार पुढे आला. जो व्यवसाय समाजाच्याप्रती आपले दायित्व आणि
कर्तव्य मान्य करतो त्याच्या प्रती समाजाच्या भावना अनुकुल आणि सहानुभूतीच्या
असतात.
v सी.एस.आर. म्हणजे काय?
सीएसआरसाठी बनवलेल्या
नियमावलीनुसार कोणतीही कंपनी ज्यांची एका आíथक वर्षाची
उलाढाल १,००० कोटी रुपयांच्या वर, निव्वळ
नफा पाच कोटी रुपये आणि नेटवर्थ ५०० कोटी रुपये आहे अशा कंपनीस त्यांच्या मागील
तीन वर्षाच्या नफ्याच्या २ टक्के इतकी रक्कम सीएसआरवर खर्च करणे बंधनकारक आहे.
सीएसआरचा उद्देश समाजातील
भूक, गरिबी, सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, लैंगिक असमानता, पर्यावरण
व सांस्कृतिक उपक्रम इत्यादीवर काम करणे होय. कुठल्याही प्रकारची कंपनी असली तरी
तिला सामाजिक जबाबदारी पार पाडावीच लागते. कोणतीही कंपनी आपल्याकडे असलेल्या
आर्थिक बळाच्या सामर्थ्यावर स्वेच्छेने आणि कायम सामाजिक कार्य करत राहणे, हि एक
सामाजिक जबाबदारी आहे. सीएसआरमुळे राष्ट्रीय विकास आणि प्रगतीसोबत
व्यवसायांनासुद्धा आपली प्रतिमा उजळण्याची संधी मिळते.
Ø लोकमंगल समूह
सोलापूर शहरातील लोकमंगल समूह हे एक
अग्रगण्य उद्योग आहे. १९९८ ला लोकमंगल सहकारी बँकेची स्थपना झाली. लोकमंगल समूह
उभारणीची ती सुरुवात होती.हे बँक लोकांना सेवा पुरविण्यात यशस्वी झाली. आणि
त्यानंतर लोकमंगल समूह उभारणीचा झपाट्याने विकास होत गेला.
Ø सामाजिक कार्य
सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळा:
सीएसआरच्या माध्यमातून लोकमंगल महत्त्वाचा उपक्रम सोलापुरात राबवतं तो
म्हणजे, सामूहिक विवाह. २००६ मध्ये हे उपक्रम सुरु करण्यात आले.
लोकमंगलने आत्तापर्यंत साडेसहाशे विवाह लावून दिलेत. सोलापूरच्या हरिभाई देवकरण
प्रशालेच्या मैदानावरील तीन लाख चौरस फुटांच्या मंडपात हे विवाह थाटामाटात पार
पडतात.
अन्नपूर्णा
योजना:
८ मार्च २०१५ रोजी
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून लोकमंगल समूहाने अन्नपूर्णा योजना सुरु केली. निराधार, गरजू
व जेष्ठ नागरिकांना दररोज घरपोच डबे पाठवून मोफत जेवणाची व्यवस्था लोकमंगल
समूहातर्फे करण्यात येते.
Ø आरोग्य
Ø जीवक हॉस्पीटल:
जिल्ह्यात आरोग्यसुविधांची वणवा असल्याचं
लक्षात घेऊन लोकमंगल जीवक हॉस्पिटल आणि संशोधन केंद्र सुरू करण्यात आलं. या
माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रस्ट या संस्थेच्या वतीनं गरजू आणि गरीब लोकांना ना नफा
ना तोटा तत्त्वावर आरोग्यसेवा पुरवली जाते. लोकमंगलचा सहभाग
असलेल्या या उपक्रमात ६० बेडचं अद्ययावत हॉस्पिटल चालवलं जातं.
Øव्हीलचेअर्स वाटप:
भगवान महावीर विकलांग समिती, मुंबई व लोकमंगल समूह यांच्या संयुक्त
विद्यमाने विकलांगाना मोफत तीनचाकी सायकल व व्हीलचेअर्स वाटप करण्यात आले.
Ø सर्वरोग निदान शिबीर:
लोकमंगल समूह व लोकमंगल जीवक हॉस्पिटलच्या वतीने सर्वरोग निदान शिबिराचे
आयोजन करण्यात आले. यामध्ये वेगवेगळे नागरिक मोफत तपासणी व औषध उपचार सेवेचा लाभ
घेतात.
रक्तदान शिबीर:
लोकमंगल समूहाने दिनांक १२ जानेवारी ते २३ जानेवारी २०१७ ‘राष्ट्रीय युवक
सप्ताह’चे औचित्य साधून रक्तदान शिबिरांचे आयोजन केले होते. प्रत्येक लोकमंगल
विवाह सोहळ्याच्या दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते यात नागरिक मोठ्या
प्रमाणात सहभागी होतात.
Ø शेक्षणिक
विद्यादान योजना: (रोहन कोमल योजना )
२०१३ पासून या योजनेची सुरुवात झाली असून या योजनेमध्ये विध्यार्थी दत्तक
घेतले जातात. agricultarl and internship च्या विध्यार्थ्यांची पूर्ण फी, राहणे,
जेवण याची संपूर्ण जबाबदारी या योजनेद्वारे घेतली जाते. हुशार असणार्या पण
परस्थितीमुले शिकू न शकणार्या होतकरू विध्यार्थ्यासाठी लोकमंगल समूहाने विद्यादान
योजना सुरु करून त्यांना आपले भविष्य घडवण्यासाठी मदत केली.
शिक्षकरत्न पुरस्कार:
देशाच्या प्रगतीमध्ये शिक्षकांचा वाट महत्वाचा असतो. संस्कारमय शिक्षण देऊन
आदर्श समज रचना करण्यासाठी शिक्षकांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचा मं-सन्मान
करणे, व समाजात त्यांची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी संस्थेने शिक्षक दिनाचे औचित्य
साधून लोकमंगल शिक्षकरत्न पुरस्कार सोहळा आयोजित कऋण शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
Ø कृषी जलसंधारण
जलसंधारण योजना:
शेतीत १०० टक्के ठिबक सिंचन करण्याच्या
उद्देशाने लोकमंगलने एक उपक्रम राबविले.त्यात जे गाव १०० टक्के ठिबक सिंचन करेल
त्याला आ एक लाखाचं बक्षीस देणार असल्याचं सांगण्यात आला. पडलेल्या पावसाचं थेंब
थेंब पाणी साठवून हिरवी क्रांती घडवून आणण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी
कार्यक्षेत्रात शिरपूर पॅटर्नचे अनेक बंधारे, पाझर तलाव उभारून
लोकमंगल कारखान्यानं या स्वप्नाला हातभार लावला.
Ø क्रीडा:
खेळामुळे सांघिक भावना,चपळतेमध्ये वाढ होते सुदृढ आरोग्य लाभते त्यामुळे
खेळाचे महत्त्व ओळखून लोकमंगल समूहातर्फे क्रीडा स्पर्धा आयोजित केली जाते.
Ø कर्मचार्यांसाठी उपक्रम:
कर्मचारांच्या कल्याणासाठी विविध उपक्रम
राबवण्यात येतात. अत्यल्प दरात गृह,वाहन,शेक्षणिक,संसारोपयोगी साहित्यासाठी
कर्जपुरवठा,कुटुंबीयांना नाममात्र दरात हॉस्पिटल उपचार,उत्कृष्ट कर्मचारी
पुरस्कार,स्वतः व्यवसाय उभारण्यासाठी अल्प दरात अर्थसहाय्य हे कल्याणकारी उपक्रम
राबवण्यात येतात.
·
जेष्टासाठी
निवासी शिबीर
लोकमंगल कर्मचारी पतसंस्थेतर्फे
कर्मचार्यांच्या वृद्ध माता पित्यांना
विनाशुल्क एक दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन केले जाते.
Ø पत्रकार दिन:
दि.6 जानेवारी 2017 रोजी पतसंस्थेच्या सर्व
33 शाखांमधून एकाच दिवशी पत्रकार दिनाचे आयोजन करून सर्व पत्रकार बंधू भगिनींचे
स्वागत व गौरवपूर्ण समारंभाचे आयोजन करून सत्कार व सन्मान करण्यात आला.
Ø कविसंमेलन:
दि.5 जुलै 2016 रोजी काविकालीदास जन्मदिन
आषाढ महिन्याचे प्रथम दिवसाचे औचित्य साधून पतसंस्थेच्या सर्व शाखांमधून ग्रामीण v
शहरी भागातील कवींचा सत्कार व सन्मान करण्यासाठी म्हणून कविसंमेलनाचे आयोजन
करण्यात आले.
Ø जागतिक महिला दिन:
दि मार्च
2017 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त समाजतील महिलांना आदर्श महिला म्हणून समाजातील
आदर्श उद्योजिका,आदर्श गृहिणी,आदर्श माता,डॉक्टर,वकील,समाज सेविका,पोलीस
अधिकारी,कलावंत,शिक्षिका,विद्यार्थिनी,खेळाडू इत्यादी क्षेत्रातील महिलांचा सत्कार
करण्यात आला
Ø जागतिक माता दिन:
11 मे रोजी संस्थेतील सर्व शाखांमधून
जागतिक माता दिन साजरा करण्यात आला.
इतर :
·
15
ऑगस्ट स्वतंत्र दिन व 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन हे राष्ट्रीय सण साजरे केले
जातात..
·
गणेशोत्सव,शिव
जयंती, मकरसंक्रांत निमित्त तिळगुळ कार्यक्रम,महिलांसाठी हळदी कुंकवाचा वान वाटप,
गुडीपाडवा लक्ष्मिपुजन इत्यदी धार्मिक कार्यक्रम करण्यात राबविण्यात येतात. .
·
राष्ट्रपुरुष,समाजसुधारक,
संशोधक यांच्या प्रीत्यर्थ साहित्यिक, तत्वज्ञ, स्वातंत्र्य सैनिक,माजी सैनिक,
शिक्षक यांचा सत्काराचाही कार्यक्रमही आयोजित करण्यात येतात.
§ लोकमंगल समूहाच्या माध्यामातून सुभाष देशमुख यांनी बरेच धर्मार्थ कार्य
करून या संस्थेला पुढील पातळी गाठण्याची जबाबदारी घेतली आहे.
§ लोकमंगल समूहाने त्यांच्या स्थापनेपासून आतापर्यंत बर्याच लोकांच्या जीवनात
बदल केला आहे.
§ शिक्षण, आरोग्य, क्रीडा कृषी, कला, संस्कृती, सामाजिक प्रश्न अशा अनेक
क्षेत्रात आपली सामाजिक जबाबदारी निभावली आहे.
No comments:
Post a Comment