फेक न्यूज ही एक
प्रकारची पीत पत्रकारिता आहे. मुद्रित अथवा दुर्चीत्रावानिसारख्या प्रसार
माध्यमातून आणि अलीकडे समाज माध्यमांमधूनाही , जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरविणे
म्हणजे ‘फेक न्यूज’. थोडक्यात बनावट बातम्या. एखादी व्यक्ती, संस्था , संघटना
किंवा राजकीय पक्षास हानी पोहोचविण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. अशा बातम्या
अगदी खरी वाटावी अशारितीने सादर केली जातात. त्यामध्ये अजिबात तथ्य नसते किंवा
थोड्या प्रमाणात असते. ऐतिहासिक कालपासूनच फेक न्यूजचा वापर झाल्याचे नोंद आहे.
तंत्रज्ञानाच्या विकासामुळे एकविसाव्या शतकात तर फेक न्यूजचि व्याप्ती अधिकच
वाढली. त्यामुळे त्यावर आळा घालण्याचा प्रयत्न माहिती व प्रसारण मंत्रालयाद्वारे
करण्यात आले. बनावट बातम्यांबाबत माहिती आणि प्रसारणमंत्री स्मृती इराणी यांना
वाटत असलेली चिंता रस्ताच आहे. परंतु बनवत बातम्यांना आळा घालण्याच्या नावाने
प्रसारमाध्यमांचा गळा घोटण्याचा प्रयत्न इराणींच्या नियमांवलीमुळे झाला आहे.
प्रसारण मंत्रालयाच्या नियमावलीनुसार
जर एखाद्या पत्रकाराने खोटी बातमी तयार केली वा पसरवली अशी तक्रार येताच त्याची
अधिस्वीकृती पंधरा दिवसांसाठी स्थगित केली जाणार आणि त्यानंतर ती बातमी खोटी की
खरी याची शहानिशा करण्यात येणार होती. यामध्ये कोणती न्यूज फेक अन कोणती नाही याचा
निर्णय प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया व न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशन 15 दिवसांत करील,
आरोपी पत्रकाराची सरकारची मान्यता (प्रेस अक्रिडीशन) रद्द करण्यासाठी त्यांना किती
शिक्षा द्यावी, याचे तपशील मात्र मंत्रालयाने ठरवून टाकले.
प्रसारण मंत्रालयाच्या या नियमांवलीमुळे
अवघ्या पत्रसृष्टीत प्रचंड घुसमट अन अस्वस्थता निर्माण झाले होते. कारण या
नियमावलीमुळे पत्रकारांची अधिस्वीकृती रद्द करणे म्हणजेच त्या पत्रकाराला सरकारचे
सर्व दरवाजे बंद करणे असे होते. म्हणजे जर एखादा पत्रकार जरा जास्तच खोलात जाऊन
काम करत असेल तर त्याच्याविरोधात बनावट बातम्यांचा तक्रार करणे काही अवघड नव्हते.
एकंदरीत माध्यमांचा गळा घोटण्याचा प्रयत्न या नियमावलीमुळे झाला. परंतु
पंतप्रधानांनी तातडीने हस्तक्षेप करून ते मागे घेण्यास सांगितल्यामुळे अशा नियमावलीतून
प्रसारमाध्यमांवरील संकट टाळले.
No comments:
Post a Comment