आपल्या मागण्या
जबरदस्तीने मान्य करून घेण्यासाठी विशिष्ट समूहात आत्यंतिक भीती निर्माण
करण्याच्या हेतूने एखादी व्यक्ती किंवा गात यांनी प्रस्थापित सत्तेच्या बाजूने
किंवा विरोधात चालविलेला हिंसाचार किंवा निर्माण केलेला धाक म्हणजे ‘दहशतवाद’ असे
म्हणण्यात येते. मुलतत्ववादी व धार्मिक कट्टरवादी विचार, वाढते नागरिकीकरण व
शहरीकरण यामुळे होणारा त्रास, सामाजिक असुरक्षिततेची भावना, आर्थिक व विकासातील
विषमता, सत्ताकांक्षा, सरकारकडून अपेक्षाभंग, अत्याधुनिक शस्त्रे व साधने यांची
सहज उपलब्धता लोकशाही व्यवस्थेचा अभाव, असहिष्णुता , धार्मिक व वांशिक विद्वेष या
आणि अशा अनेक कारणांमुळे दहशतवाद उदयास येऊन त्यात अधिक भर पडत आहे.
सर्वच
प्रकारच्या, सर्वच धर्मियांच्या दहशतवादाने आणि त्यामुळे निर्माण होणार्या समस्या
ह्या केवळ सामाजिक, आर्थिक व मानसिक स्वरूपाच्या नसून त्यातून मानवी जीवनाच्या
अस्तित्वाचा अति-गंभीर प्रश्न टाकलेला आहे. दहशतवादी संख्येने अल्प असले तरी ते जी
परिणामकारक साधने वापरत असतात त्यातून सारखे जे तांडव निर्माण होते ते सर्वच
समुदायांना कोणत्या ना कोणत्या प्रती दहशतवादाचा आश्रय घेण्यास भाग पडत आहे. त्याचाच
परिणाम म्हणून अनेक लोकांन्ना प्राण गमवावे लागत आहे. दहशतवादाची शिकार झालेल्या
लोकांची कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. सामाजिक तसेच राष्ट्राच्या सुरक्षिततेची भवन
धोक्यात येत आहे. त्यामुळे एकूण राष्ट्राची व शेवटी जागतिक सुरक्षितता भंग पावत
चाललेली आहे.
दहशतवाद ही केवळ एका राष्ट्राची समस्या न
राहता जागतिक समस्या बनली आहे. आज जगातील कोणत्याही, मोठ्या शहरात सात-आत दहशतवादी
स्वयंचलित बंदुका घेऊन कोठेही मोठ्या प्रमाणावर हिंसाचार घडवू शकतात हे विदारक
सत्य आहे. जागतिक व्यापार, परिवहन क्षेत्रातील क्रांती आणि माहिती तंत्रज्ञान
क्षेत्रातील माहितीमुळे संपूर्ण जग हे एक खेडेगाव बनले आहे. दहशतवाद यापूर्वीही
होता. परंतु त्यात धर्माधिष्टीत आत्मघातकी हल्लेखोरांमुळे ही समस्या अधिक जटील
झाली आहे. हल्लेखोर स्वतःच्या जीवाची पर्वा करत नसल्यामुळे कोणतेही सुरक्षा-कवच भेदू
शकतात आणि स्वतःभोवती स्पोटके लावून मोठ्या प्रमाणावर हिंसाचार घडवून आणू शकतात.
आत्मघाती हल्लेखोरांच्या ठायी मृत्यूनंतर स्वर्गात आपली जागा पक्की आहे, अशा
प्रकारची विचारसरणी भिनवली गेलेली असते. दहशतवादी संघटनेचा वाढता प्रभाव हा जागतिक
पातळीवर मोठा धोका ठरू लागला आहे. त्यामुळे दहशतवाद हा जागतिक रोग किंवा महामारी
होण्यापूर्वी त्याबाबत काही पावले उचलणे अपेक्षित आहे. याशिवाय महत्वाची बाब
म्हणजे दहशतवादाविरुद्ध लढताना निष्पापांचे बळी जाणार नाहीत किंवा हजारो, लाखो
कुटुंबांना विस्थापित व्हावे लागणार नाही याची काळजी घ्यायला हवी. अन्यथा अशा
कारवाईत बळी पडलेल्यांचे नातलग किंवा विस्थापित यांच्या मनात संबंधित देशाविरुद्ध,
यंत्रणेविरुद्ध सुडाची भावना निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
No comments:
Post a Comment