Wednesday, 2 May 2018

परभाषा ज्ञानाचं संपादन करा परंतु स्वतःच्या भाषेतच संभाषण करा.

                                    एखादा बाळ जन्माला येऊन त्याला जेव्हा आजुबाजूच्या परीसराबद्दल कळायला  लागतं, ते मातृभाषेतूनच.प्रत्येकाला आपली मातृभाषा प्रिय असते कारण इतर सर्व भाषांपेक्षा सर्वात जवळची वाटणारी आणि आपले विचार इतरांना पटवून देण्यासाठी सर्वात सोपी भाषा ही आपली मातृभाषा असते. महाराष्ट्राची मराठी  ही जरी एकच  राजभाषा असली तरी प्रत्येक प्रांताची  भाषा निराळी. त्यात कोकणी, वऱ्हाडी, अहिराणी घाटी, असे वेगवेगळ्या भाषा आहेत. मराठी भाषा ही जगातील प्रमुख भाषांपैकी एक आहे.
परंतु आजच्या जागतिकीकरणाच्या काळात मराठी भाषा आणि संस्कृती नष्ट होण्याची चिन्हे जास्त प्रमाणात दिसत आहेत. आजच्या तरुण मंडळींना इंग्रजी भाषेचे जास्त आकर्षण आहे कारण त्यांचं महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षण सर्व इंग्रजीतून होत असतं. आपल्या मातृभाषेतून शिक्षण घेतलं तर बाहेरच्या जगात आपला निभाव लागणार नाही. असे आजच्या तरुणांचं मत आहे. यामुळे शिक्षणासाठी इंग्रजी सारख्या परक्या भाषेचा स्वीकार केल्याने मराठी भाषा धोक्यात आली आहे.
इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की, स्वतःच्या भाषेतून आपल्याला जेवढे सहज व्यक्त होता येते तेवढे इतर भाषेतून होत नाही. म्हणून मातृभाषा सर्वार्थाने आत्मसात करावी. तसेच ज्ञान वाढवण्यासाठी म्हणून इतर भाषाही आत्मसात करावे. प्रत्येक मराठी माणसाला मराठी भाषा बोलता, लिहिता, वाचता आली पाहिजे. परदेशात गेलात तरी आपल्या मराठीला विसरु नये.
मराठी भाषा संवर्धनासाठी आधुनिक प्रयत्न होताना दिसत आहेत. जागतिक संदर्भात मराठी भाषिकांचे प्रचंड संख्या पाहायला मिळते. संगणक तंत्रज्ञान मराठी भाषेत उपलब्ध होत आहे. विविध ज्ञानशाखांमधील उपयुक्त ज्ञान मराठीत येत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे 'मराठी विकिपीडिया'.

                          मराठी भाषेचे महत्व, मराठी भाषेचा गोडवा हे ज्याला कळल त्याच्यासाठी मराठी भाषाही मोठे धन आहे. आई-वडिलांनी शिकवलेल्या मराठी मातृभाषेला विसरणे म्हणजे आई-वडिलांनाच विसरल्यासारखे आहे. म्हणून परभाषा ज्ञानाचे संपादन करा परंतु स्वतःच्या भाषेतच संभाषण करा.

स्मार्ट शहरे कि प्रदूषित शहरे

                    देशातील जास्तीत जास्त शहरे स्मार्ट बनविण्याचा  संकल्प करण्यात आला. स्मार्ट शहरे म्हणजे स्वच्छ व सुंदर शहरे. जिथे पायाभूत सुविधा असतील, जिथे शाश्वत विकासाला प्राधान्य असेल, जिथे पायाभूत सुविधांची कमतरता नसेल. प्रत्येक कामासाठी स्मार्ट सुविधा असतील .स्मार्ट सिटीमध्ये प्रामुख्याने पायाभूत सुविधा, ई-प्रशासन, पुरेसा पाणी पुरवठा, सुनिश्चीत वीजपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, सक्षम सार्वजनिक परिवहन अश अनेक प्रकल्पांचा समावेश आहे. परंतु नुकताच  जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केलेल्या  प्रदूषण संदर्भातील अह्वालामुळे शहरे  स्मार्ट होत आहेत कि प्रदूषित याची शंका निर्माण होत आहे.
                  
                 जागतिक आरोग्य संघटनेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या जगातील सर्वाधिक वीस प्रदूषित शहरांच्या  यादीत सर्वाधिक भारतीय शरंचा समावेश आहे. या यादीतील वीस पैकी चौदा प्रदूषित शहरे 
हि केवळ भारतातच आहेत. दिल्ली, मुंबई, कानपूर फरीदाबाद, गया,पाटणा, आग्रा, मुझ्झफुरनगर, जयपूर, जोधपुर यासारख्या शहरात प्रदूषणाची पटली सर्वाधिक आहे असे या अहवालात म्हटले आहे. या अहवालानुसार मुंबई शहराचा जागतिक स्तरावर चौथा क्रमांक आहे. वाढते उद्योगधंदे, वाढते शहरीकरण, वाढते लोकसंख्या यामुळे  व अशा अनेक कारणांमुळे पर्यावरनाची हानी होत आहे .स्मार्ट सिटी साठी निवडलेल्या शहरांचाच या प्रदूषित शहरांच्या आहवालात जास्त प्रमाणात समावेश आहे. त्यामुळे या प्रश्कडे लक्ष देणे गरजेचे आहे.           
              पर्यावरण  संरक्षण हि एक सामाजिक जबाबदारी असून त्यासाठी पर्यावरण सरंक्षण करणे हि सर्वांची सामाजिक बांधिलकी आहे. पृथ्वीवरील सर्व सजीव सृष्टींचा आधार पर्यावरण  आहे. पृथ्वी सोडून इतर कोणत्याही ग्रहावर यासारखे पर्यावरण नाही. त्यामुळे येथील  पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करणे सर्व सजीव सृष्टीस अत्यावश्यक आहे. कोट्यवधी वर्षाच्या स्थित्यंतरानंतर येथील हवा, पाणी व जमीन यांचे पोषक असे वातावरण तयार झाले असले तरी गेल्या काही दशकात मानवी उद्योगामुळे त्यात बरेच बदल होत आहेत. त्यामुळे शहरे स्मार्ट करण्याच्या अगोदर प्रदूषण विरहीत शहरे निर्माण करणे गरजेचे आहे.


















Wednesday, 11 April 2018

सायबर गुन्हा

          सध्याचे युग हे तंत्रज्ञांनाचे युग आहे. आता जवळ जवळ सर्वच दस्तावेज कॉम्पुटरमध्ये पाठवले जातात.व गरज असेल तेव्हा इंटरनेट वरून एकीकडून दुसरीकडे पाठवले जातत. सध्या तर डीजीटल इंडिया संकल्पनेतून सुरु झालेले कँशलेश व्यवहार आणि सोहल  मिडिया यांचावापर अधिक प्रमाणात वाढला आहे. परंतु या नवनवीन तंत्रज्ञानाच्या शोधाचा एक दुष्परिणाम म्हणून सायबर गुन्ह्यात वाढ होत आहे. मोबाईल आणि संगणकाच्या माध्यमातून होत असणारा गुन्हा,यालाच सायबर गुन्हा म्हणतात.संगणकावरील माहितीची चोरी करणे,संगणक नेटवर्क, सर्वरमध्ये बिघाड करणे,इंटरनेटचा उपयोग करून छळने, इमेलच्या सहाय्याने फसवणूक करणे, क्रेडीट कार्ड द्वारे फसवणूक करणे, बनावट नोटा, पायरसी, अशील चित्रे, मेसेज इत्यादी प्रकारे सायबर गुन्हे केले जातील.आधुनिक काळात ही एक जागतिक समस्या बनली आहे.
        भारतात सायबर यंत्रणेवर अवलंबून असणार्यांचे प्रमाण अधिक आहे.या मोबाईल धारक आणि इंटरनेट ग्राहक यांचा समावेश होतो. आय.टी उद्योग, दूरसंचार क्षेत्र,आर्थिक सेवा, बँकिंग क्षेत्र, विमान क्षेत्र,वाहतूक सेवा, आरोग्य सेवा, उर्जा क्षेत्र यात खाजगी क्षेत्रांची माहिती लक्षणीय प्रमाणात आहे.परंतु पुरेश्या सुरक्षेसाठी ही क्षेत्रे सायबर हल्ल्यांना सहजपणे बळी पडू शकतात हे पाहता सायबर सुरक्षेची नितांत गरज आहे.जागतिक पातळीवरील वाढत्या सायबर हेरगिरीच्या पार्श्वभूमीवर दूरसंचार मंत्रालयाने ‘राष्ट्रीय सायबर सुरक्षा 2013’ धोरण तयार करण्यात आले.परंतु भारतात सायबर सुरक्षा व्यवस्था म्हणावी तेवढी चोख नाही.त्यामुळे भारत हा सायबर हल्लेखोरांचे लक्ष्य होणे उघड आहे. देशाची संरक्षण व्यवस्था, आर्थिक, वैज्ञानिक व अंतराळ संशोधनाशी संबंधित संस्थाना यादृष्टीने अत्यंत सुरक्षित करावे लागेल. अन्यथा आपले शत्रू अपरिमित नुकसान करू शकतील. 
           हे टाळण्यासाठी  सायबर सेक्युरिटी व्यवस्था नेहमी अद्द्यावत ठेवावी व उत्तमात उत्तम असे दर्जेदार अँन्टी व्हायरस सॉफ्टवेअर वापरावे.  अनोळखी आणि संशयास्पद मेल उघडू नका. पॉर्न साईटपासून कटाक्षाने दूर राहावे. व्यक्तिगत पातळीवर  सुरक्षेची काळजी घेतली तर सायबर हल्ल्यापासून बर्याच प्रमाणात वाचता येऊ शकेल.  खास करून अधिकारी आणि सरकारी खात्यांनी अधिक सावध राहावे.

फेक न्यूज

          फेक न्यूज ही एक प्रकारची पीत पत्रकारिता आहे. मुद्रित अथवा दुर्चीत्रावानिसारख्या प्रसार माध्यमातून आणि अलीकडे समाज माध्यमांमधूनाही , जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरविणे म्हणजे ‘फेक न्यूज’. थोडक्यात बनावट बातम्या. एखादी व्यक्ती, संस्था , संघटना किंवा राजकीय पक्षास हानी पोहोचविण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. अशा बातम्या अगदी खरी वाटावी अशारितीने सादर केली जातात. त्यामध्ये अजिबात तथ्य नसते किंवा थोड्या प्रमाणात असते. ऐतिहासिक कालपासूनच फेक न्यूजचा वापर झाल्याचे नोंद आहे. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे एकविसाव्या शतकात तर फेक न्यूजचि व्याप्ती अधिकच वाढली. त्यामुळे त्यावर आळा घालण्याचा प्रयत्न माहिती व प्रसारण मंत्रालयाद्वारे करण्यात आले. बनावट बातम्यांबाबत माहिती आणि प्रसारणमंत्री स्मृती इराणी यांना वाटत असलेली चिंता रस्ताच आहे. परंतु बनवत बातम्यांना आळा घालण्याच्या नावाने प्रसारमाध्यमांचा गळा घोटण्याचा प्रयत्न इराणींच्या नियमांवलीमुळे झाला आहे.
           प्रसारण मंत्रालयाच्या नियमावलीनुसार जर एखाद्या पत्रकाराने खोटी बातमी तयार केली वा पसरवली अशी तक्रार येताच त्याची अधिस्वीकृती पंधरा दिवसांसाठी स्थगित केली जाणार आणि त्यानंतर ती बातमी खोटी की खरी याची शहानिशा करण्यात येणार होती. यामध्ये कोणती न्यूज फेक अन कोणती नाही याचा निर्णय प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया व न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशन 15 दिवसांत करील, आरोपी पत्रकाराची सरकारची मान्यता (प्रेस अक्रिडीशन) रद्द करण्यासाठी त्यांना किती शिक्षा द्यावी, याचे तपशील मात्र मंत्रालयाने ठरवून टाकले.
       प्रसारण मंत्रालयाच्या या नियमांवलीमुळे अवघ्या पत्रसृष्टीत प्रचंड घुसमट अन अस्वस्थता निर्माण झाले होते. कारण या नियमावलीमुळे पत्रकारांची अधिस्वीकृती रद्द करणे म्हणजेच त्या पत्रकाराला सरकारचे सर्व दरवाजे बंद करणे असे होते. म्हणजे जर एखादा पत्रकार जरा जास्तच खोलात जाऊन काम करत असेल तर त्याच्याविरोधात बनावट बातम्यांचा तक्रार करणे काही अवघड नव्हते. एकंदरीत माध्यमांचा गळा घोटण्याचा प्रयत्न या नियमावलीमुळे झाला. परंतु पंतप्रधानांनी तातडीने हस्तक्षेप करून ते मागे घेण्यास सांगितल्यामुळे अशा नियमावलीतून प्रसारमाध्यमांवरील संकट टाळले.      

दहशतवाद एक सामाजिक समस्या

          आपल्या मागण्या जबरदस्तीने मान्य करून घेण्यासाठी विशिष्ट समूहात आत्यंतिक भीती निर्माण करण्याच्या हेतूने एखादी व्यक्ती किंवा गात यांनी प्रस्थापित सत्तेच्या बाजूने किंवा विरोधात चालविलेला हिंसाचार किंवा निर्माण केलेला धाक म्हणजे ‘दहशतवाद’ असे म्हणण्यात येते. मुलतत्ववादी व धार्मिक कट्टरवादी विचार, वाढते नागरिकीकरण व शहरीकरण यामुळे होणारा त्रास, सामाजिक असुरक्षिततेची भावना, आर्थिक व विकासातील विषमता, सत्ताकांक्षा, सरकारकडून अपेक्षाभंग, अत्याधुनिक शस्त्रे व साधने यांची सहज उपलब्धता लोकशाही व्यवस्थेचा अभाव, असहिष्णुता , धार्मिक व वांशिक विद्वेष या आणि अशा अनेक कारणांमुळे दहशतवाद उदयास येऊन त्यात अधिक भर पडत आहे.
         सर्वच प्रकारच्या, सर्वच धर्मियांच्या दहशतवादाने आणि त्यामुळे निर्माण होणार्या समस्या ह्या केवळ सामाजिक, आर्थिक व मानसिक स्वरूपाच्या नसून त्यातून मानवी जीवनाच्या अस्तित्वाचा अति-गंभीर प्रश्न टाकलेला आहे. दहशतवादी संख्येने अल्प असले तरी ते जी परिणामकारक साधने वापरत असतात त्यातून सारखे जे तांडव निर्माण होते ते सर्वच समुदायांना कोणत्या ना कोणत्या प्रती दहशतवादाचा आश्रय घेण्यास भाग पडत आहे. त्याचाच परिणाम म्हणून अनेक लोकांन्ना प्राण गमवावे लागत आहे. दहशतवादाची शिकार झालेल्या लोकांची कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. सामाजिक तसेच राष्ट्राच्या सुरक्षिततेची भवन धोक्यात येत आहे. त्यामुळे एकूण राष्ट्राची व शेवटी जागतिक सुरक्षितता भंग पावत चाललेली आहे.
             दहशतवाद ही केवळ एका राष्ट्राची समस्या न राहता जागतिक समस्या बनली आहे. आज जगातील कोणत्याही, मोठ्या शहरात सात-आत दहशतवादी स्वयंचलित बंदुका घेऊन कोठेही मोठ्या प्रमाणावर हिंसाचार घडवू शकतात हे विदारक सत्य आहे. जागतिक व्यापार, परिवहन क्षेत्रातील क्रांती आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील माहितीमुळे संपूर्ण जग हे एक खेडेगाव बनले आहे. दहशतवाद यापूर्वीही होता. परंतु त्यात धर्माधिष्टीत आत्मघातकी हल्लेखोरांमुळे ही समस्या अधिक जटील झाली आहे. हल्लेखोर स्वतःच्या जीवाची पर्वा करत नसल्यामुळे कोणतेही सुरक्षा-कवच भेदू शकतात आणि स्वतःभोवती स्पोटके लावून मोठ्या प्रमाणावर हिंसाचार घडवून आणू शकतात. आत्मघाती हल्लेखोरांच्या ठायी मृत्यूनंतर स्वर्गात आपली जागा पक्की आहे, अशा प्रकारची विचारसरणी भिनवली गेलेली असते. दहशतवादी संघटनेचा वाढता प्रभाव हा जागतिक पातळीवर मोठा धोका ठरू लागला आहे. त्यामुळे दहशतवाद हा जागतिक रोग किंवा महामारी होण्यापूर्वी त्याबाबत काही पावले उचलणे अपेक्षित आहे. याशिवाय महत्वाची बाब म्हणजे दहशतवादाविरुद्ध लढताना निष्पापांचे बळी जाणार नाहीत किंवा हजारो, लाखो कुटुंबांना विस्थापित व्हावे लागणार नाही याची काळजी घ्यायला हवी. अन्यथा अशा कारवाईत बळी पडलेल्यांचे नातलग किंवा विस्थापित यांच्या मनात संबंधित देशाविरुद्ध, यंत्रणेविरुद्ध सुडाची भावना निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.     

Tuesday, 10 April 2018

ऑनलाईन मिडिया आणि मनोरंजन


              एकविसाव्या शतकाचं वैशिष्ट्य म्हणजे इंटरनेटचा सर्व क्षेत्रात वाढलेला वापर. एकमेकांशी संपर्कासाठी पत्रव्यवहाराऐवजी ई-मेल, व्हॉट्सअॅप, फेसबुकसारखे सोशल मीडिया, बातम्यांसाठी वर्तमानपत्रं वाचण्याऐवजी गुगल न्यूज, याहू न्यूज, अॅपल न्यूज, ट्विटरसारखी अॅप्लिकेशन्स वापरण्याकडे कल वाढत चालला आहे.  .
           पुस्तकं, कपडे, फर्निचर, औषधं, खाद्यपदार्थ किंवा कुठलीही एखादी वस्तू खरेदी करायची असेल, तरी ती इंटरनेटद्वारे मिळू शकते. बँकेचे व्यवहार असोत, इन्कमटॅक्स, सेल्सटॅक्स भरायचा असो, रेल्वेचा किंवा विमानाचा प्रवासच नाही, तर गावातल्या गावात कुठेही जायचं असो, सगळ्यांसाठी आज इंटरनेट वापरावंच लागतं.इंटरनेट ही आता चैन राहिली नसून, काळाची गरज होऊन बसली आहे. एके काळी सतत नेट वापरणाऱ्यांना नेटसॅव्ही म्हटलं जायचं. एखादी व्यक्ती सतत ऑनलाइन असणं ही प्रतिष्ठेची बाब समजली जायची; पण आज घरकाम करणाऱ्या अशिक्षित मोलकरणीदेखील त्यांच्या रोजच्या कामांसाठी सफाईने मोबाइल वापरतात.
         लोक एक-दोन तास रोजच या इंटरनेट माध्यमामध्ये व्यतीत करतात. सगळे धरबंध सोडून ते या मायाजालाच्या आभासी जगात एवढ्या मोठ्या प्रमाणात गुरफटले आहेत, की त्यांना या इंटरनेट,  आणि तत्सम तंत्रज्ञानाचं व्यसनच लागलं आहे.
         माहिती गोळा करणं आणि माहिती साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संगणकीय मायाजालाची मोहिनी, आज प्रत्येकाच्या आयुष्याच्या कानाकोपऱ्यात
पसरली आहे. आणि यामुळे अगदी दोन वर्षांच्या बाळापासून विशीतल्या तरुणापर्यंत सर्वच या ऑनलाईन माध्यमांचे गिऱ्हाईक असतात
v इंटरनेटचे  मनोरंजनाच्या दृष्टिने फायदे  :


·               ·          आपल्या आयुष्यातल्या घडामोडी स्टेटसच्या किंवा फोटोच्या रूपाने सतत पोस्ट आणि 
               अपडेट केल्या जातात.
·        नवनवीन व्हिडीयो, स्टोरीज शेअर केले जातात. नवनवीन मित्रमत्रिणी हमखास बनवता येतात.
·         ट्विटरवर सेलिब्रिटींना फॉलो करून त्यांच्याबद्दल जाणून घेता येते. एकूणच त्यांच्याशी थेट संपर्कात आहोत असं वाटते.
·        सिनेमा पाहणं असो अथवा आवडत्या सीरिअलचा बघायला न मिळालेला एपिसोड असो त्यासाठी यूट्युबची मदत होते.
·         ई बुक वाचण्यासाठी आणि ऑनलाईन गेम खेळण्यासाठी, गाणी डाऊनलोड करण्यासाठी इंटरनेट वापरले जाते.
·              ·           इंटरनेट उपलब्ध असेल तर कितीही वेळ मेसेजिंग अ‍ॅपच्या सहाय्याने संवाद साधता येतो.
·                           स्काईपच्या मदतीने तर थेट परदेशी असणार्या व्यक्तीशी व्हिडीओ चॅटिंग सहज शक्य होते.
              
v इंटरनेटचे मनोरंजनाच्या दृष्टिने वाईट परिणाम किंवा तोटे
·      ·          इंटरनेटचे व्यसन वाढले.
·      ·        .अहोरात्र मोबाइलवर नेट सुरू ठेवणं.
·      ·        सकाळी उठल्यावर प्रथम मोबाइलमधील मेसेज चेक करणे, आपल्या पोस्ट्स पाठवणं.
·      ·        दिवसाला भरमसाठ फोटो फेसबुक, इन्स्टाग्रॅम किंवा व्हॉट्सअॅपवर टाकणं.
·     ·           सुरक्षिततेचा प्रश्न.
·      ·        इतरांच्या आयुष्यात लक्ष घालणे.
·      ·        शारीरिक  तसेच मानसिक परिणाम.

दुरचीत्रावाणीचा स्टुडीओ


               लोककला, नाटक आणि चित्रपट या मनोरंजनाच्या चढत्या पायरीवर आलेलं टेलिव्हिजन थेट सर्वांच्याच दिवाणखाण्यात विसावलं.बातम्या, माहितीपर कार्यक्रम, काही मनोरंजनाचे कार्यक्रम यांच्या प्रक्षेपणातून टीव्हीच्या छोटय़ा पडद्याने सर्वसामान्यांचं आयुष्य व्यापायला सुरुवात केली. दूरचित्रवाणी हे मध्यम ‘द्रुकश्राव्य’ मध्यम आहे. त्या माध्यमाची भाषा दृश्य आणि ध्वनीची असते. एक दृश्य हे शंभर शब्दांपेक्षा बोलकं असत ,असं म्हणतात. पाहणं हि एक गुंतागुंतीची दृश्य प्रक्रिया असल्याने ती कौशल्यपुर्णरीत्या हाताळावी लागते. लेखनापेक्षा कॅमेऱ्याने लेखन करणं किंवा दृश्य टिपणं मोठं अवघड काम असते. त्याची तीव्रता, अंतर, दृष्टीकोन, ते हाताळण्याची पद्दत यातून एक अर्थपूर्ण दृश्यमालिका तयार करण्यास वाव असतो.
  दूरचित्रवाणी हे यंत्राधीष्टीत मध्यम आहे. दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमांची यशस्वीपणे निर्मिती करण्यासाठी आवश्यक असतो तो दुरचित्रावणीचा स्टुडीओ. कार्यक्रम निर्मितीकरिता आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या यंत्रणेने सुसज्ज असा ध्वनीअवरोधक कक्ष म्हणजे स्टुडीओ
ü दूरचित्रवाणीचा स्टुडीओ :-
             कार्यक्रम निर्मितीकरिता आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या यंत्रणेने सुसज्ज असा ध्वनीअवरोधक कक्ष म्हणजे स्टुडीओ. या स्टुडिओमधून आवाज बाहेर पडणार नाही आणि आत मध्ये निर्माण झालेल्या ध्वनी तरंगाचा प्रतिध्वनी असणार नाही अशा तऱ्हेने तो सज्ज करण्यात येतो. स्टुडीओ एका साधारण खोलीतही निर्माण करता येतो किंवा जर आर्थिक पाठबळ आणि व्यावसायिक गरज असेल तर १०० चौरस फुट आकारातही उभारता येतो.
        दूरचित्रवाणीचा स्टुडीओ दोन प्रकारात विभागण्यात आलेला असतो.
1      Production Control Room- निर्मिती नियंत्रण कक्ष
2     Floor- चित्रीकरण स्थळ


1 Production Control Room -निर्मिती नियंत्रण कक्ष
        या कक्षातील प्रत्येक यंत्रणा हि दूरचित्रवाणीचा कार्यक्रम सुलभ, सुकर आणि प्रवाही होण्याकरिता सहाय्यभूत ठरणारी असते.कार्यक्रमच्या निर्मितीची बहुतांश प्रक्रिया हि कक्षात पूर्ण करण्याकरता निर्माता आणि त्यांचे सहाय्यक झटत असतात.  
           ध्वनीमुद्रक चित्रीकरणाच्या वेलीचे वेगवेगळ्या ध्वनिक्षेपकांमधून येणारे आवाज धानिविमुद्रित करत असतो. तसेच निर्मात्याच्या निर्देशनानुसार चित्रित पुर्व्ध्वनिमुद्रित पार्श्वसंगीताचे भाग त्यात जोडत असतो.
       व्हिजन मिक्सर संचालक ( Vision Mixture Operator) निर्मात्याच्या निर्देश्नानुसार चित्रित दृश्यांची निवड करून त्यांचे अंतिम मुद्रण करीत असतो. तर कॅमेरा कंट्रोल युनिटचा अभियंता स्टुडीओतील सर्व कॅमेराच्या यथायोग्य कार्यक्षमतेची काळजी घेत असतो.

Ø निर्मिती नियंत्रण कक्षात वापरण्यात येणारी यंत्रणा
v Camera Contro Unit - कॅमेरा नियंत्रण यंत्रणा  
       चित्रीकरण स्थळाच्या टिकाणी असलेले सर्व कॅमेरा व्हिडीओ डीस्ट्रीब्यूशन आम्प्लीफायर आणि व्हिजन मिक्सरला कॅमेरा कंट्रोल युनिटमार्गे जोडण्यात आलेले असतात. याद्वारे प्रत्येक कॅमेराचा ऑफरचर ऑप्टीकल फोकस, भिंग प्रणालीचे झूम बीम फोकस व कॅमेरा ट्युबचा ब्राईटनेस कंट्रोल हे सर्व प्रस्तुत यंत्रणेद्वारे करता येते. या यंत्रणेचे संपूर्ण नियंत्रण हे कॅमेरा कंट्रोल युनिट अभियंत्याच्या हाती असते.

v Light Contro Unit – प्रकाशयोजना नियंत्रण यंत्रणा
     हि यंत्रणा कॅमेरा नियंत्रण यंत्रणा आणि व्हिजन मिक्सरच्या शेजारी बसवली जात असून टी प्रकाशयोजनकाराच्या हाती असते. यामुळे निर्माता प्रकाश योजन्कारच्या मदतीने त्याला हवी तशी प्रकाशयोजना करवून घेत शकतो.

v Vision Mixure-व्हिजन मिक्सर
        यालाच व्हिडीओ मिक्सर असेही म्हणतात. कार्यक्रमाल आवश्यक आणि साजेशा दृश्य स्रोतांची निवड निर्मात्याला तत्काळ करता येण्याची सोय या याम्न्त्रानेद्वारे उपलब्ध आहे.
        या  यंत्रनेला 10 ते 20 विविध पुरवठा करणारे स्रोत (कॅमेरा, व्ही.टी.आर. टेलीसाने) जोडण्यात येतात. आनि 6 ते 10 विविध बहिर्घामी स्रोत घेता येतात.

2  Floor -चित्रीकरण स्थळ
    यालाच इंग्रजीत फ्लोअर(Floor), फिल्ड(Field) किंवा अक्शन झोन (Action Zone)असेही म्हणतात. निर्मात्याचा सहाय्यक ,पण चित्रीकरण स्थळाचा प्रांभारी (Incharge) म्हणून फ्लोअर मॅनेजर हे पद असते. फ्लोअरवर कार्यक्रमाला साजेसा रंगमंच लावून घेणे आणि एकूण व्यवस्था बघणे हे काम फ्लोअर मॅनेजरचे असते. शिवाय कार्यक्रमाच्या अंतिम चित्रीकरणाच्या  किंवा थेट प्रक्षेपणाच्या दरम्यान, कार्यक्रम नियंत्रण कक्षात बसून निर्देश देणाऱ्या निर्मात्याच्या आणि चित्रीकरणात सहभागी झालेल्या कलावंतांच्या मधला दुवा म्हणून देखील कार्य करण्याची जबाबदारी फ्लोअर मॅनेजरची असते.

3 Outdoor Broadcasting Van – आउटडोर ब्रॉडकास्टिंग व्हॅन
                यालाच ओ.बी. व्हॅन असे लोकप्रिय नाव आहे. स्टुडीओमध्ये असलेली संपूर्ण यंत्रसामग्री या व्हॅनमध्ये उपलब्ध असते. थेट प्रक्षेपण (Live Telecast) करण्याकरता या व्हॅनचा उपयोग करण्यात येतो. हा चाकांवाराचा फिरता स्टुडीओच म्हणला जातो.

Ø स्टुडीओमध्ये असणारी यंत्रसामग्री

v कॅमेरा :
     बदलत्या तंत्रज्ञानानुसार अत्याधुनिक व्हिडीओ  कॅमेराचा वापर करण्यात येत असला तरी कॅमेऱ्याची संख्या तीन असावी असा रूढ संकेत आहे. दोन बाजूंना दोन कॅमेरा ठेऊन नाटकीय दृष्य्त्मक प्रभाव निर्माण करण्यात येतो, तर कधी मध्यभागी ठेऊनही चित्रीकरण केले जाते.

v Tripod-तिपई :         
        प्रत्येक कॅमेरा हा पायांना चाके असलेल्या आणि वरच्या टोकावर कॅमेरा बसवण्याची सोय असणारी धातूची आडवी पट्टी असणार्या तिपईवर घट्ट बसवण्यात आला असतो. हि धातूची पट्टी त्यावरील सोयीमुळे कॅमेरा घट्ट ठेवते. कॅमेरा जमिनीला समांतर आहे कि नाही हे दाखविणारे संतुलानमापक यंत्र तेथे बसवलेले असते. 
v Light - प्रकाशयोजना   
       चित्रीकरणाला साजेशी अशी प्रकाश योजना करणे हे कौशल्याचे काम असते. चित्रपटांचे चित्रीकरण असो कि व्हिडीओचे, प्रकाशयोजना हि यथायोग्य नसेल तर त्या चीत्रीकार्नातून हवा तो परिणाम साधता येत नाही.
दूरचित्रवाणी स्टुडीओमध्ये तीन प्रकरच्या प्रकाशयोजनाचा वापर केला जातो ते पुढीलप्रमाणे,
 1 Key Light- की लाईट
     की लाईट हा प्रकाशाचा मुख्य आणि सर्वात मजबूत स्रोत असतो. एखादी वस्तू किंवा व्यक्ती दाखविण्याचा  यामध्ये प्रयत्न केला जातो.
2 Fill Light- फील लाईट
    एखाद्या वस्तू किंवा व्यक्तीची सावली तयार करण्यासाठी फील लाइटचा उपयोग केला जातो. या लाईटने कृत्रिम सावली तयार करता येते.
3 Back Light- बॅक लाईट
    एखाद्या वस्तूची पार्श्वभूमी दाखविण्यासाठी  बॅक लाईटचा वापर केला जातो.
4 Microphones-मायक्रोफोन्स
     रेडिओ स्टुडीओमध्ये ध्वनी रेकॉर्डिंगसाठी मायक्रोफोनचा वापर केला जातोमाय्क्रोफोंच्या माध्यमातून आवाजाची तीव्रता वाढविणे व कमी करणे हे काम केले जाते. मायक्रोफोनचे तीन प्रकार पडतात.
1.Unidirectional-युनिडायरेक्शनल
2. Bydirectional - बायडायरेक्शनल
3.Omanidirectional- ओम्नीडायरेक्शनल