
एकविसावे शतक हे
विकास आणि तंत्रज्ञानाचे शतक आहे. सर्वांनाच सुंदर शहरे, सर्वागीण विकास हवं आहे
आणि हा विकास पुरविण्याच्या उद्देशाने
शासनाद्वारे ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. स्मार्ट शहर याचा अर्थ
जिथे कुठल्याही पायाभूत सुविधेची कमतरता नाही असे स्वच्छ, सुंदर शहर . त्यात
शाश्वत विकासाला प्राधान्य असेल व प्रत्येक कामासाठी स्मार्ट सुविधा असतील. स्मार्ट
शहरासाठी शहरातीलच एक विशिष्ट भाग निवडून त्यात या स्मार्ट सुविधा देण्यात येतील.
स्मार्ट सिटीमध्ये प्रामुख्याने पायाभूत सुविधा, ई-प्रशासन, पुरेसा पाणी पुरवठा, सुनिश्चित वीजपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, सक्षम – गतिशील सार्वजनिक परिवहन, किफायतशीर घरे, सक्षम आय.टी कनेक्टीवीटी व डीजीटलायजेशन, सुस्थिर पर्यावरण, आरोग्य,शिक्षण व्यवस्था, सुरक्षा, व्यापार केंद्र, कौशल्य विकास केंद्र इ. चा अंतर्भाव आहे. स्मार्ट सिटी ही एक आदर्शवत संकल्पनेमुळे जीवनाचा दर्जा उंचावणे, गुंतवणुकीत वाढ, रोजगार निर्मिती, कार्यक्षम वाहतूक व्यवस्था, निवास व्यवस्था, आरोग्य, शिक्षण इ. अनेक फायदे लोकांना अनुभवास येणार आहेत.
स्मार्ट सिटी ही संकल्पना सर्वसाधारणपणे १९८०
च्या दशकात सर्वप्रथम समोर आली. शहरांची नवी ओळख म्हणून या संकल्पनेचा पुढे विकास
झाला. स्मार्ट सिटी मिशनमध्ये २०१५-१६ ते २०१९-२० या पाच वर्षांच्या काळासाठी
सुमारे ९८ शहरांची नागरिक विकास विभागांच्या मुल्याकनावर निवड झाली.
महाराष्ट्राचा विचार करता
बृहन्मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, नाशिक, अमरावती, सोलापूर, नागपूर,
पुणे, औरंगाबाद या शहरांची स्मार्ट सिटीत निवड झाली.सोलापूरची जव्ह प्राथमिकरीत्या
स्मार्ट सिटीसाठी निवड झाली तेव्हापासून सोलापुरातल्या प्रत्येक नागरिकाला एक नवी
उभारी, एक नवी आशा-दिशा मिळाल्यासारख
वाटल. अनेक वर्षे सोलापूरचा थंडावलेला वेग, एक प्रकारचं दुर्लक्षिलेलंपण यातून
स्मार्ट सिटीच्या माध्यमातून एक आशादायी किरण सर्वांना दिसू लागला.
स्मार्ट सिटी या एकंदरीत प्रकल्पाच्या
पूर्ततेसाठी सोलापुरात स्वतंत्र अशा कंपनीची स्थापना करण्यात आली. त्याला स्मार्ट
सिटी डेव्ह्लपमेंट कोर्पोरेशन लि. असे त्याचे नामकरण झाले. या कंपनीच्या संचालक
मंडळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था पदाधिकारी, राज्य शासन व केंद्र शासन यांचे
प्रतिनिधी तसेच काही तज्ञ मंडळींचा सहभाग आहे.
सोलापूर महानगरपालिका मध्ये प्रशासन यांनी
लोकजन सहभाग वाढविण्यासाठी विविध विविध उपक्रम घेण्यात आले. यामध्ये Vision Statement तयार करणे,
क्षेत्राविकासासाठी क्षेत्रानिवड करणे तसेच Smart Solution साठी Technocrat Cell
हा Technology Partener म्हणून कार्यरत असताना संयोगाने “ Techno Fair” चे आयोजन
करण्यात आले. निबंध स्पर्धा लोगो/ बोधचिन्ह स्पर्धा, पोष्टर स्पर्धा, Digital
India, Mygov.intraining programme असे अनेक उपक्रम राबविण्यात आले.
स्मार्ट सिटी ही केंद्र सरकारची एक
महत्वकांक्षी योजना आहे. विकासाच्या दृष्टीने चाललेला हा स्मार्ट कित्य प्रकल्प
अधिक गतिशील प्रगतीचे प्रतिक दर्शवितो. अशा या आदर्शवंत संकल्पनेचे अनेक विविधांगी फायदे अनुभवास येणार आहेत.
No comments:
Post a Comment