गेल्या दोन दशकापासून आपला देश अविकसित ते विकसनशील ते विकसित अश्या विविध टप्प्यावरून
प्रवास करीत आहे. 2020 पर्यंत विकसित देश म्हणून गणना होण्याच्या दृष्टीने जर
ध्येय, उद्दिष्टे डोळ्यासमोर असतील तर भारतामध्ये ‘पायाभूत आरोग्य सेवा’ व
‘आरोग्याबद्दल ज्ञान प्रसाराचे कार्य’ हे वेगाने व मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक
आहे. एखादा देश विकसित आहे किंवा नाही हे त्या देशातील कारखान्यांच्या
निर्देशानावर ठरविले जात नाही, तर टे त्या देशातील बालमृत्युचे प्रमाण, साक्षरता व
मुलभूत आरोग्य सेवांच्या उपलब्धतेवर ठरिवले जाते. कुपोषण, अतिसार, श्वसन मार्गाचे
विकार व डेंगू मलेरिया सारखे साथीचे रोग आश्या विविध आजारामुळे मानवी आरोग्य
मोठ्या प्रमाणात धोक्यात येत आहे. प्रचंड लोकसंख्या, आरोग्याबद्दल अज्ञान,
निरक्षरता व आरोग्याच्या दृष्टीने भयानक अंधश्रद्धा, रूढी, परंपरा या अडचणीमुळे
आपल्या देशातील आरोग्याची स्थिती विकसित देशाच्या तुलनेत खूपच कमी आहे.
म्हणून आरोग्य विषयक जागृती होणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी ‘आरोग्य विषयक
ज्ञान प्रसाराचे कार्य’ हे आरोग्यविषयक स्थिती सुधारण्यासाठी अतिशय उपयुक्त साधन
आहे.
‘माहिती व जनसंपर्क महासंचालनालया’ मार्फत आकाशवाणी आपल्या
श्रोत्यांना केंद्रबिंदू मानून विविध कार्यक्रमांची आखणी, अंमलबजावणी आणि प्रसारण
करीत असते. विविध विषयावरील तज्ञ मंडळींचे विचार
सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावे
याकरता आकाशवाणीच्या कार्यक्रमामध्ये भाषण, चर्चा, मुलाखती यासारखे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. त्यातील एक म्हणजे आरोग्य
विषयक कार्यक्रम. ‘आरोग्यबद्दल’
माहिती देताना, विविध रोगाबद्दलचे गैरसमज
दूर करने, रोगप्रतीबंध उपचार तसेच रोगोपचारांबद्दल माहिती देणे हि प्रमुख
उद्दिष्टे समोर ठेवले जाते.
No comments:
Post a Comment