आजच्या माहिती युगात सर्व
बाजूंनी माहितीचा प्रचंड मारा होत आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला एखाद्या
गोष्टीबाबत नेमका कोणता निर्णय घ्यावा हे अवघड वाटते. अशावेळी लोक अनुभवी किंवा
तज्ञ व्यक्तींचे मत घेतात. त्यांनाच मतनेते म्हणून ओळखले जाते. मतनेत्यांकडून
मिळालेली माहिती एक विश्वासार्ह स्रोत म्हणून ओळखला जातो. म्हणून लोक प्रत्येक
गोष्टीत मतनेत्यांचा सल्ला घेतात. निवडणुकीत यश मिळविण्याकरिता जनमत अजमावणे
आवश्यक असते. त्यामुळे आजच्या काळात जनमताला सर्वाधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
संदेशवहनाची माध्यमे वाढण्याचा परिणाम
केवळ माहितीच्या आदान-प्रदानातच होत नाही. तर मतनिर्मिती व जागृतीच्या स्वरूपातही
होतो. पूर्वी माहितीच्या मर्यादित उपलब्द्तेमुळे एका विशिष्ट पद्दतिने विचार
करण्याची सक्ती समाजावर होत होती. परंतु आजच्या काळात अशाप्रकारे मतनिर्मितीवर
निर्बंध शक्य नाही. जनमत वास्तवतेकडे झुकले असल्याने सत्य व अचूक माहिती तातडीने
उपलब्ध होत आहे. परिणामतः भावनेपेक्षा विवेकाने प्रभावित होणारे जनमत निर्माण होत
आहे. समाजाची एकंदरीत रचना बदलून सामाजिक निर्णयात जनमताला महत्त्वाचे स्थान
प्राप्त झाले आहे.
एखाद्या सार्वजनिक महत्वाच्या वादग्रस्त
मुद्द्यंवर एखाद्या लोकसमुहाच्या सदस्यांनी अभिव्यक्त केलेला विचार, विश्वास जनमत तयार होणार्या प्रक्रियेत, समूहातील
वैयक्तिक पातळीवरील मते महत्वाची भूमिका पार पडत असतात. म्हणजेच, “एकाच विषयाच्या
संदर्भात स्वारस्य असलेल्या लोकांचं मत म्हणजे जनमत होय”.
जनमत घडविण्यात सर्वात महत्वाची भूमिका मतनेते
बजावतात. जनमताचा प्रत्यय आपल्याला सातत्याने येत असतो आणि प्रामुख्याने विविध
निवडणुकामध्ये जनमताचे पारडे या बाजूला किंवा त्या बाजूला झुकलेले आपल्याला दिसते.
याशिवाय जाहिरातींच्या माध्यमातून प्रसारामाध्यमंच्याद्वारे जनमत घडविताना
आपल्याला दिसून येते. जनमतावर प्रभाव गाजवनार्या घटकात मतनेते महत्वपूर्ण भूमिका
बजावतात.
निवडणुकीत यश मिळविण्याकरिता जनमत आजमावणे आवश्यक आहे. नवीन मतदार संघ,
वाँर्ड, प्रभाग, गण-गट रचना, राजकीय व सामाजिक सध्यस्थिती जाणून घेणे मतदारांचा
कौल आजमावणे, मतदारांच्या प्रमुख समस्या तसेच त्यांचा प्रमुख प्रतिसाद आणि
प्रतिक्रिया जाणणे, प्रतिस्पर्धी इच्छुक उमेदवारांची राजकीय स्थिती व तुलनात्मक
प्रभाव, पक्ष पातळीवर व वैयक्तिकरित्या मिळणाऱ्या यशाचे प्रमाण आदी माहिती
आजमावण्याकरिता जनमत सर्वेक्षण आवश्यक असते. मतदारांचा कल जनमत सर्वेक्षणातून
स्पष्ट होतो. त्याप्रमाणे निवडणूक पूर्वतयारी करणे तसेच धोरणात्मक रणनीती
ठरविण्यास सर्वेक्षणाचा उपयोग होतो.
Ø
ओपिनियन पोल:-
निवडणुकीच्या काळात मतदानापूर्वी विविध
मतदारसंघामध्ये जाऊन मतदारांकडून प्रश्नावली किंवा मुलाखतीद्वारे लोकांची चाचणी
केली जाते. त्याला ‘ओपिनियन पोल’ असे म्हणतात.
मतदारांच्या मनातील अचूक मत आजमावण्यासाठी
तसेच उमेदवाराला आवश्यक असलेली माहिती मिळविण्यासाठी ओपिनियन पोल घेतले जाते.
निवडणुकीतील उमेदवारापैकी कोणता उमेदवार निवडून येण्यची शक्यता वाटते, कोणत्या
पक्षाला जास्त मते मिळतील असे प्रश्न विचारले जाते.
v
भारतातील पहिला ओपिनियन पोल
भारतात 1980 साली निवडणूक अंदाज चाचण्या घ्यायला
सुरुवात झाली. टाईम्स ऑफ इंडिया समूहानं 1980 साली लोकसभा निवडणुकीसाठी पहिली
निवडणूक निकाल चाचणी करवून घेतली. एनडीटीव्हीचे प्रमुख प्रणव रॉय आणि माँर्ग या
मार्केट रिसर्च फर्म यांना ते काम देण्यात आलं होतं. या चाचणीत प्रणव रॉय यांनी
इंदिरा गांधी दोन तृतीयांश बहुमतानं निवडून येतील असं भाकीत केलं होतं.
आणीबाणीनंतर जनता पक्ष सत्तेवर होता. त्या पक्षाविरोधात एवढं विक्रमी मतदान इंदिरा
घन्दिना होईल याची कल्पना राजकीय पंडितांना नव्हती. इंदिरा गांधी आणीबाणीत बदनाम
झाल्या होत्या. त्यांना मतदार एवढ्या मोठ्या प्रमाणात कसं स्वीकारतील असं लोकांना
वाटत होतं. पण हे निवडणूक अंदाज बरोबर ठरले.
तेव्हापासून भारतात निवडणूक अंदाज चाचण्या घेतल्या जातात. प्रणव
रॉय, योगेंद्र यादव हे या क्षेत्रातील
विश्वासार्ह नावं आहेत.
Ø एक्झिट पोल:-
प्रत्येक
निवडणुकीच्या मतदानानंतर होणार्या मतदान चाचणीला ‘एक्झिट पोल’ असे म्हणतात.
एक्झिट पोल मतदानाच्या दिवशीच केला
जातो. मतदान करून आल्यानंतर मतदाराला कुणाला मत दिलं हे विचारलं जातं. त्या मतदान
केंद्रावर किती मतदार आहेत, याची माहिती अगोदरच घेतलेली असते, त्यानुसार ठराविक
मतदार केंद्र निवडली जातात. आणि सांखिकी पद्दतीने माणसांची निवड करून त्यांच्याद्वारे मिळालेल्या माहितीचे विश्लेषण
करून आकडेवारी निश्चित करतात.
प्रत्येक मतदारसंघातल कोणत मतदान
केंद्र निवडायचं हे सांखिकी पध्दतीनेच (सॅम्पल सिलेक्शन) ठरवलं जातं. मतदान करून
आल्यानंतर मतदारावर पहिला अर्धा तास प्रभाव कायम असतो कि, त्याने कोणाला मतदान केलंय.
त्यामुळे तिथे खरं उत्तर दिलं जातं, याला मानसशास्त्रीय आधार असल्याचं मानलं जातं.
ओपिनियन पोलचे अंदाज बदलू शकतात, कारण
तो मतदानापूर्वी घेतला जातो. तर एक्झिट पोल हा निकालाच्या जवळ जाणारा असू शकतो,
कारण तो मतदान केल्यानंतर काही वेळातच जाणून घेतला जातो.
v भारतातला पहिला एक्झिट पोल:-
भारतात 1996 साली पहिला एक्झिट पोल करण्यात
आला. याला प्रशासनानेही पुरेपूर सहकार्य केलं होतं. एका ठराविक वारंवारतेने
येणाऱ्या ठराविक मतदाराला सांगितलं जायचं, की तुमच्यासाठी आणखी एक मतदान आहे.
त्यानुसार त्याच्याकडून डमी बॅलेट पेपरवर शिक्का मारून घेतला जायचं. अगोदर ज्याला
मतदान केलं त्यालाच इथेही करा असा सांगितलं जायचं. अशा पद्दतीने पहिला एक्झिट पोल
केला गेला.
No comments:
Post a Comment