Saturday, 10 February 2018

जंक फूड

                                                   
                            सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला वेळ खूप कमी पडतो.त्यामुळे स्वयंपाकामागचा वेळ कमी करण्यासाठी सहजतेने घरपोच गरम गरम मिळणाऱ्या जेवणाला सार्वजन पसंती देतात.मग यामध्ये वाडा पाव, सामोसा, डोनट,पिझ्झा,बर्गर,रोल इत्यादीसारख्या जंक फूडचा समावेश होतो.या फूडला लोकांची पसंती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे.परुंतु वारंवार जंक फूड खाल्यान विपरीत परिणाम होतात.जंक या शब्दाचा अर्थ आहे फुकट गेलेली वस्तू जिचा काहीही फायदा होत नाही.
                         जंक फूड आपली भूक नक्कीच भागवते परंतु हे फूड खाल्याने विविध आजार हे उपहाराच्या स्वरूपाने मिळतात.जंक फूड खाल्याने एकाग्रतेवर विपरीत परिणाम होतात.शरीरातील उर्जा संपुष्टात येते.लट्ठपणा वाढतो,ब्लड प्रेशर वाढते,मधुमेहाची समस्या उद्भवते.
                         या समस्या प्रामुख्याने लहान मुलांमध्ये फारश्या आढळून येत आहेत.त्यामुळे या समस्येला आळा घालण्यासाठी कार्टून चँनेलवर जंकफुडच्या जाहिराती दाखवण्यास केंद्र सरकारने बंदी घातली आहे.
                          जंक फूड खाणंं हे आरोग्यदायी नसतं हे माहित असूनही लोकांना ते पूर्णपणे  टाळण अवघड होत,म्हणून केवळ जाहिरातींवर बंदी घालून उपयोग नाही तर अशा जंक फूड विकण्यावरच बंदी घातल्यास लोकांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल.  

No comments:

Post a Comment