Friday, 16 February 2018

'लोकशाहीमध्ये निवडणुकासदृढ, भयमुक्त आणि पारदर्शक असावे’- जे.एस.सहारिया


     
 
   “लोकशाहीमध्ये सुशासन करायचे असेल तर केवळ सदृढ,भयमुक्त आणि पारदर्शक निवडणुकाद्वारेच ते साध्य होईल”,असे प्रतिपादन राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जे.एस. सहारिया यांनी केले.
    सोलापूर विद्यापीठात आयोजित ‘लोकशाही निवडणुका व सुशासन’ या विषयावर आधारित चर्चासत्रातील उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे, निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू नितीन करमळकर,कुलसचिव जी.आर. मंझा उपस्थित होते.
      निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया म्हणाले,स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लोकसभा,विधानसभेच्या निवडणुकापेक्षा अत्यंत क्लिष्ट आणि महत्वाचे आहेत.त्यामुळे निवड प्रक्रियेतील विविध मुद्द्यांवर संशोधन होणे गरजेचे आहे.
      लोकशाहीची संकल्पना,निवडणूक प्रकियेत राज्य निवडणूक आयोगाची भूमिका व त्यासमोरील आव्हाने,निवडणूक पद्धती, जनजागृतीची आवश्यकता अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी मार्गदर्शन केले.तसेच मतदार यादीत नाव नसलेल्या युवकांनी आपली नावनोंदणी करावी,आपल्या अधिकाराचा वापर करावा आणि निवडणूक प्रक्रियेत प्रत्येकाने स्वयंजागृत राहावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
       जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले म्हणाले,लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्यव्यवस्था म्हणजे लोकशाही. म्हणून या लोकशाहीत प्रत्येक नागरिकाने आपली मतदानाची भूमिका बजावायला हवी. निवडणूक प्रक्रियेसंदर्भात विविध कारणांमुळे शिक्षक फारसे उत्सुक नसतात. पण विविध योजनाची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम हे सुशिक्षितांचे आहे. निवडणूक प्रक्रिया संशोधनासाठी राष्ट्रीय उच्चस्तर अभियानांतर्गत मिळणाऱ्या निधीचा वापर करता येवू शकतो.त्यासाठी विविध महाविद्यालयांनी एकत्र येवून संघमताने संशोधन करावे.

      यावेळी विद्यापीठातील विविध विभागाचे संचालक,प्राध्यापक, विद्यार्थी परिषदेचे प्रतिनिधी, निवडणूक साक्षरता क्लबचे सदस्य,नोडल ऑफिसर आदी उपस्थित होते.प्रास्ताविक जी.आर.मंझा यांनी केले.सूत्रसंचालन तेजस्विनी कांबळे यांनी,तर आभार आर.बी.चिंचोलकर यांनी मानले.     

Saturday, 10 February 2018

'हँसी तो फँसी'

             
                 राज्यसभेत राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देत असताना कॉंग्रेसच्या खासदार रेणुका चौधरी जोरजोरात हसत होत्या.यावेळी  व्यंकया नायडू यांनी रेणुका चौधरींना रोखण्याचा प्रयत्न केला.पण मोदींनी हजरजबाबीपणा दाखवत रेणुका चौधरींना टोला मारला.त्यांनी सभापती व्यंकय्या नायडू यांना  म्हटले,'सभापतीजी, रेनुकाजी को कुछ मत कहिये,क्योंकी रामायण सिरीयल के बाद बहुत दिनों के बाद ऐसी हंसी सुनने का सौभाग्य प्राप्त हुआ है।' असा टोमणा मारला.
                 मोदींच्या या वक्तव्यानंतर केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रीजिजुंनी शूर्पणखेचा व्हिडीओ शेअर केला.भाजपचे खासदार आणि अभिनेते परेश रावल यांनीही 'हंसी तो फंसी' असे रेणुका चौधरींचं नाव न घेता ट्विट केल.अनेक युजर्सही  या विषयावर  कमेंट करायला सुरुवात केली.एकंदरीत राज्यसभेतील मोदींचा 'पंच' हा विषय सोशल मिडियावर चांगलाच चर्चेत आहे. 

जंक फूड

                                                   
                            सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला वेळ खूप कमी पडतो.त्यामुळे स्वयंपाकामागचा वेळ कमी करण्यासाठी सहजतेने घरपोच गरम गरम मिळणाऱ्या जेवणाला सार्वजन पसंती देतात.मग यामध्ये वाडा पाव, सामोसा, डोनट,पिझ्झा,बर्गर,रोल इत्यादीसारख्या जंक फूडचा समावेश होतो.या फूडला लोकांची पसंती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे.परुंतु वारंवार जंक फूड खाल्यान विपरीत परिणाम होतात.जंक या शब्दाचा अर्थ आहे फुकट गेलेली वस्तू जिचा काहीही फायदा होत नाही.
                         जंक फूड आपली भूक नक्कीच भागवते परंतु हे फूड खाल्याने विविध आजार हे उपहाराच्या स्वरूपाने मिळतात.जंक फूड खाल्याने एकाग्रतेवर विपरीत परिणाम होतात.शरीरातील उर्जा संपुष्टात येते.लट्ठपणा वाढतो,ब्लड प्रेशर वाढते,मधुमेहाची समस्या उद्भवते.
                         या समस्या प्रामुख्याने लहान मुलांमध्ये फारश्या आढळून येत आहेत.त्यामुळे या समस्येला आळा घालण्यासाठी कार्टून चँनेलवर जंकफुडच्या जाहिराती दाखवण्यास केंद्र सरकारने बंदी घातली आहे.
                          जंक फूड खाणंं हे आरोग्यदायी नसतं हे माहित असूनही लोकांना ते पूर्णपणे  टाळण अवघड होत,म्हणून केवळ जाहिरातींवर बंदी घालून उपयोग नाही तर अशा जंक फूड विकण्यावरच बंदी घातल्यास लोकांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल.  

'प्राँमीस' टूथपेस्ट कोणी विकत घेता का ?

       
       

                          पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बंगळुरुत सभा झाली.या सभेच्या दुसर्याच दिवशी अभिनेते प्रकाश राज यांनी ट्विटर वर  '२०१४ मध्ये पंतप्रधान मोदींनी विकलेली प्रॉमिस टूथपेस्ट कोणाच्याही चेहऱ्यावर हसू फुलवू शकली नाही. आणि बंगळुरुत झालेल्या रँलीत हि प्रॉमिस टूथपेस्ट मोदी पुन्हा विकण्याचा प्रयत्न केला .मात्र त्यांच्या आश्वासनांना भुलून जाऊ नका' असे ट्विट केले.

             'सबका साथ सबका विकास हा नारा देत मोदी  सरकार   सत्तेत आले .  कॉंग्रेस   पक्षाला  ६५ वर्षे सत्ता दिलात, भाजपला फक्त पाच वर्षे सत्ता द्या  आणि बघा अच्छे दिन आएंगे' या मोदींच्या शब्दावर सर्व  जनता  भाजप पक्षाला विजय मिळवून दिला. केंद्रात मोदी सरकार सत्तेवर येताच सर्वार्थाने विकास होईल अशी जनतेची अपेक्षा होती पण गेल्या पावणेचार वर्षांच्या सरकारच्या  कारभारावर देशातील जनता समाधानी नसल्याचे वास्तव दिसून येत आहे.
       मोदी सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी आणि ग्रामीण भागाकडे लक्ष केंद्रित केलेले आहे.  आयुष्मान भारत योजनेद्वारे  ५० कोटी लोकांना  मदत मिळणार ,कृषी क्षेत्रात रब्बी पिकांप्रमाणेच  खरीप पिकांनाही उत्पादन खर्चाच्या दीडपट उत्पन्न मिळेल, कृषी मालाच्या आयात-निर्यातीबाबत योग्य धोरण तयार केले जाईल, शेतकऱ्यांसाठी ग्रामीण भागात पायाभूत सुविधा स्थापन करणार   असे कृषी, आरोग्य आणि ग्रामीण भाग या क्षेत्रांवर भर देण्यात आला आहे .पण हे करताना  मध्यमवर्गीय किंव्हा शहरी नागरिकांना लाभापासून वंचित ठेवले आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर मध्यमवर्गीय आणि नोकरदारांची  सरकारकडून खुप अपेक्षा होत्या. पण हि अपेक्षा सरकारने पूर्ण केली नाही. योजनांचा फक्त गाजावाजाच होत राहिला पण त्याची अंमलबजावणी योग्य रीतीने झाली नाही. जीएसटी ,नोटाबंदी, पंतप्रधानांच्या विदेशी यात्रा,मेक इन इंडिया या सर्वांचा फायदा होईल, शेतकऱ्यांना फायदा  होईल, आतंंकवाद  नष्ट होईल,तरुंणांना नोकर्या  मिळतील असे सरकारने आश्वासने दिली होती. पण आश्वासने पूर्ण करण्यात सरकार अपयशी झाल्याचेच दिसून येत आहे.
                            जनता आपल्या  या अपेक्षा भंगानंतर पुन्हा प्रॉमिस टूथपेस्ट विकत घेणार कि नाही हे पाहणे औत्सुक्यचे राहील.




                                                                                                                         





Monday, 5 February 2018

गरीब श्रीमंतांमधील दरी हि हनुमानाच्या शेपटीसारखी दिवसेंदिवस वाढतच आहे.

                                                                  पू.ल.देशपांडे म्हणतात कि,ज्याला शंभर किलो  धान्याच पोत उचलता येत त्याला ते विकत घेता येत नाही, आणि ज्याला विकत घेता येत त्याला त्याला उचलता येत नाही. इथे प्रश्न शक्तीप्रदर्शनाचा नाही तर गरिबी श्रीमंतील आहे. 'सबका साथ सबका विकास' या धोरनेवर समाजातील सर्व लोकांचा विकास करणार असे घोषणा ऐकू येत आहेत.परंतु ऑक्सफँम या आंतरराष्ट्रीय संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये गरीब श्रीमंतामध्ये असलेली दरी यावर प्रकाश पाडला आहे.
                                         स्वित्झर्लंडमधील   दावोस  शहरमधील परिषदेच्या पार्श्वभूमीवर ऑक्सफँम या संस्थेचा अहवाल प्रसिद्ध झाला या अहवालात असे सांगितले आहे की एकट्या भारतात 1% अब्जाधीशकडे देशातील 5.8 टक्के संपत्ती एकवटली आहे. दरवर्षी वाढच होत आहे तर कामगारांच्या वेतनात दोन एक टक्क्यांनी वाढ होत नाही. यामुळे श्रीमंत अधिक  श्रीमंत होत आहेत तर  गरीब अधिक गरीब होत आहेत.

                          गरीब-श्रीमंतांमधील ही आर्थिक विषमतेची दरी जीवन संपेल का हाच खरा प्रश्न आहे.


                                                                                                                                  प्रिया लगशेट्टी.